४ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ या काळात 'चैतन्य' मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यात श्रीमद भगवद पुराणाचे पठण आणि विवेचन करण्यात आले. उज्ज्वला दामले, सुलभा कुलकर्णी, मंजिरी झळकीकर, भारती गंगातीरकर , सुशीला कुलकर्णी आणि शोभना गोसावी या सहा जणींचा समूह 'चैतन्य'मध्ये आठ दिवस राहिला आणि त्यांनी हा कार्यक्रम सादर केला. 'चैतन्य' मधील अनेक निवासी आणि काही विश्वस्त या सप्ताहाला भक्तिभावाने आवर्जून उपस्थित होते.